Published On : Wed, May 31st, 2023
By Nagpur Today Nagpur News

कोराडीत प्रस्तावित वीज प्रकल्प; जे कालपर्यंत करत होत विरोध ते आज करतायत समर्थन ?

- एनटीपीसी प्रकल्पाला बावनकुळे,जयस्वालांचा होता विरोध

नागपूर : कोराडी १३२० मेगावॅटच्या वीजसंचाच्या जनसुनावणीत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. कोराडी भागात वीजसंचामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मात्र २०१० मध्ये एनटीपीसी प्रकल्पाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार ॲड. आशीष जयस्वाल यांनी विरोध केला होता. याकडे पर्यावरणवाद्यांनी लक्ष वेधत आता बावनकुळे कोराडी प्रकल्पाला समर्थन देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले. काल पर्यंत प्रकल्पाला विरोध करणारे आज याच संबंधित प्रकल्पाला समर्थन देत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मौदा तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पामध्ये २०१० मध्ये १,३२० मेगावॅटचा औष्णिक विद्युत प्रकल्प प्रस्तावित होता. त्यासाठी आयोजित जनसुनावणीत विद्यमान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार ॲड. आशीष जयस्वाल यांनी प्रकल्पाला विरोध करत गोंधळ घातला होता. त्यामुळे जनसुनावणी रद्द करण्यात होती.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यादरम्यान एनटीपीसीचे अधिकारी आपली बाजू समजावून सांगत असताना ग्रामस्थांनी व्यासपीठावर धाव घेत तोडफोड केली. त्यामुळे वीज अधिकारी निघून गेले. त्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांनी माईक हाती घेत विस्तार प्रस्तावाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

जनसुनावणी पूर्णपणे प्रस्तावित विस्ताराच्या विरोधात गेली. बावनकुळे, जयस्वाल, जाधव, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, पर्यावरणवादी सुधीर पालीवाल, स्वानंद सोनी, सीमा साहू आणि प्रद्युम्न सहस्रभोजनी, ऊर्जातज्ज्ञ आरबी गोयंका, शेतकरी नेते किशोर तिवारी आणि इतर अनेकांनी विविध कारणांनी विस्तारीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध केला.

बावनकुळे यांनी एनटीपीसीला शब्दात न मिसळता सांगितले की, जोपर्यंत वीज कंपनी टप्पा-१ बाबत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत नाही तोपर्यंत टप्पा-२ चे काम सुरू होऊ देणार नाही.
एनटीपीसीने कोणत्याही स्थानिक रहिवाशाशी न बोलता पर्यावरण प्रभाव अहवालाचा मसुदा तयार केला आणि त्यामुळे हे बेकायदेशीर असल्याचा आरोपही आमदारांनी केला होता.
दरम्यान कोराडी प्रकल्पात ६६० मेगावॅटचे २ संच प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेत सोमवारी जनसुनावणी झाली. उपस्थितांमध्ये भाजपा कार्यकर्ते, भाजपा समर्थक कंत्राटदार, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसकडून सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध होता. जनसुनावणी दरम्यान काँग्रेसचे नेते प्रकल्पाच्या विरोधात मुद्दे मांडत असतानाच गर्दीतून प्रकल्पाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु होती. त्यामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला.

Advertisement