Published On : Thu, Jun 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

राज्यात ओबीसी जनगणना करा ; अनिल देशमुखांची मागणी

Advertisement

नागपूर : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकार ओबीसींच्या खऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, माजी गृहमंत्रीअनिल देशमुख यांनी ओबीसी जनगणना करण्याची मागणी केली. आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

केंद्र सरकारकडे आम्ही दोन दिवसीय ओबीसी सेलच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजात जवळपास 350 जाती आहेत. त्यांच्यामध्ये किती कुणबी, तेली आणि माळी सदस्य आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे जेणेकरून त्यांना आरक्षणासह इतर फायदे देणे सोपे होईल, असे देशमुख म्हणाले.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कोल्हापुरात दंगल भडकवल्याचा आरोप करणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारवरही देशमुख यांनी हल्लाबोल केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याचाही देशमुख यांनी समाचार घेतला. भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांवर टीका करण्यापूर्वी त्यांच्या स्थितीचा आणि त्यांच्या अनुभवाचा विचार केला पाहिजे.

मटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप केला. आता त्यांनी आरोप सिद्ध करण्याचे पवारांचे आव्हान स्वीकारावे, असे देशमुख म्हणाले.

Advertisement
Advertisement