अकोला – महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेबाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. भारतातील कोणताही मुस्लिम औरंगजेबाचा वंशज नाही आणि देशातील राष्ट्रवादी मुस्लिम मुघल सम्राटाला आपला नेता मानत नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर यांच्या या कृतीवर वाच्यताही केली नाही, असे म्हणत फडणवीस यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अकोल्यातील जाहीर सभेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले, ‘अकोला, संभाजीनगर आणि कोल्हापुरात जे काही घडले तो योगायोग नसून प्रयोग होता. औरंगजेबाचे सहानुभूतीदार राज्यात कसे आले? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
‘औरंगजेब आमचा नेता कसा होऊ शकतो? आपला राजा एकच आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाचे वंशज नाहीत. मला सांगा औरंगजेबाचे वंशज कोण आहेत? औरंगजेब आणि त्याचे पूर्वज कुठून आले? औरंगजेब आणि त्याचे पूर्वज बाहेरून आले, फडणवीस म्हणाले.