Advertisement
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
आम्ही हा अर्थसंकल्प केवळ चालू वर्षाचा विचार करून तयार केलेला नाही. तर पुढील पाच वर्षांचा विचार करून तयार केला आहे.
या पाच वर्षांत कुणी गमतीने जरी म्हटले की, अमक्या-तमक्याने मुख्यमंत्री व्हा आणि पाठिंबा देतो. तरी ते काही शक्य नाही.
तुमच्याकडे आमदारच नाहीत तर तुम्ही पाठिंबा कसला देणार? १० ते २० टाळकी (आमदार) असताना हे आम्हाला पाठिंबा देणार का? पण मी एक एक सांगतो, पाच वर्षांत ब्रह्मदेव आला तरी या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही, असे पवार म्हणाले.