Published On : Mon, Apr 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

उद्धव ठाकरेंचे “सामना” मुळे राजकीय अस्तित्व धोक्यात;चंद्रशेखर बावनकुळे यांचे टिकास्त्र

Advertisement

नागपूर:राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी “सामना” या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखांवरून संजय राऊत यांच्यावरही आरोप केला की, हे लेख उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी लिहिले जात आहेत. बावनकुळे यांच्या मते, ठाकरे यांचा सध्याचा वावर पाहता, ते कधी मुख्यमंत्री होते, यावर विश्वास बसत नाही, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.

महात्मा जोतिबा फुले यांच्यावर आधारित चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना, बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मानसिक अस्थिरतेचे आरोप केले. त्यांनी सांगितले की, फडणवीस सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस केली आहे, परंतु ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात असा विचारही झाला नव्हता.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बावनकुळे यांनी ठाकरे यांना “अकलेचा कांदा” आणि “बिनबुडाचे चंबू” असे संबोधून, त्यांची राजकीय भूमिका आणि निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यांच्या मते, ठाकरे यांची सध्याची भूमिका केवळ भांडण लावण्याची असून, सत्ता गेल्यानंतर ते अगतिक झाले आहेत.
या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तापमान वाढले आहे. ठाकरे आणि बावनकुळे यांच्यातील हा वाद आगामी महापालिका निवडणुकांवर काय परिणाम करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Advertisement
Advertisement