Published On : Tue, Dec 3rd, 2019

देशाच्या प्रत्येक नागरिकांना न्याय हेच सुविधांचे उद्देश – विजय बारसे

Advertisement

अल्पसंख्यानक व एस सी एस टी ओ बी सी संविधानामुळेच मुख्य प्रवाहात – येशवंत तेलंग

भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन तर्फे संविधान चौक नागपूर येथ महात्मा फुले शिक्षन महर्षी तथा सम्राट यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ भारतीय अल्पसंयकां फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय बारसे या कार्यक्रमाचे उदघाटक होते तर येशवंत तेलंग राष्ट्रीय अध्यक्ष री.पा (खो ) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. या प्रसंगी विजय बारसे म्हणाले कि, फुले , कबीर , बुद्ध, आंबेडकर यांच्या वैचारिक तत्वप्रणालीचा साविंधनच्या माध्यमातून विजय झाला असून राज्यात आज शपत विधी प्रसंगाने जातीवादी तत्वाला मूठ माती मिळाली आहे.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज बौद्ध, क्रिश्चन , जैन , पारशी, मुस्लिम या अल्पसंख्याक दलित ओबिसि व देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षा, रोजगार, स्वास्थ हे मूलभूत अधिकार मिळण्यास नवीन सरकारला शुभेच्छा देत असून देशाच्या प्रत्येक नागरिकांना न्याय हेच सुविधांचे उद्देश विजय बारसे यांनी मत व्यक्त केले. या प्रसंगी येशवंत तेलंग राष्ट्रीय अध्यक्ष री.पा (खो ) व भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन चे राष्ट्रीय महासचिव मानले कि आज देशात साविंधन तत्व प्रणालीचे अंमलबजावणी आरंभ होण्याची प्रक्रिया आरंभ झाली असून खऱ्या अर्थाने वेगळा विदर्भ , शेतकरी शिष्यवृत्ती आरोग्य शिक्षा रोजगार विविध बाबींच्या प्रश्नांना न्याय मिळण्याची सुरवात होणे म्हणजे हा सुविधांचा विजय होय यातून अल्पसंख्यानक व एस सी एस टी ओ बी सी संविधानामुळेच मुख्य प्रवाहात येणे हे खरे साविंधान अस्तित्वात येण्याची संविधानिक कृती होय असे येशवंत तेलंग मानले.

या वेळी प्रामुख्याने विविध राजकीय , सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकार संपादक जगदीश भाऊ कोहळे वीरेंद्र दहीकार, ताराचंद मेंढे हंसराज घुटके, यशपाल डोंगरे डॉली,नंदेश्वर रेशीम नंदेश्वर श्रीमती डोंगरे अमोल सरदार आनंद वानखेडे उपस्तित होते,

Advertisement
Advertisement