Published On : Mon, Oct 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्य सरकारचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय;मुख्यमंत्री शिंदेंनी केली टोलमाफीची घोषणा

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. आज (14 ऑक्टोबर) झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महायुती सरकारने टोलमाफीची घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.

मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही.आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

Today’s Rate
Mon14 Oct. 2024
Gold 24 KT 76,400 /-
Gold 22 KT 71100 /-
Silver / Kg 91,200/-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान विधानसभा निवडणूक लक्षात घेता महायुती सरकारकडून जनतेला आकर्षित करण्यासाठी हे निर्णय घेण्यात येत आहे. शिंदे सरकारकडून गेल्या महिनाभरात 165 च्या आसपास निर्णय घेण्यात आले आहेत.

Advertisement