नागपूर : नागपूर शहर वसविणारे नागपूर नगरीचे संस्थापक गोंडराजे बख्त बुलंदशहा यांच्या समाधीचे संवर्धन करण्यासाठी ९ कोटी ७२ लाखांचा आराखडा नागपूर सुधार प्रन्यासने राज्य शासनाकडे आहे, त्याला 9 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही काम प्रलंबित आहे.
या ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे.हे अतिक्रमण तत्काळ काढून आवश्यक तो निधी देण्याचे NIT आणि NMC ला द्यावेत अशी मागणी केली.
सक्करधरा येथे असलेल्या या समाधी स्थळाचे कामाला गती मिळावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांकडून होत असल्याची माहिती दटके यांनी दिली.
नागपूर सुधार प्रन्यासकडे हे काम असून समाधीचे संवर्धन होऊन नागपूरचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार दटके यांनी केली.
आजच या ठिकाणचे अतिक्रमण काढून निधी देण्याचे आदेश NIT ला देत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितले.