नवी दिल्ली:विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला 6 विकेट्सने हरवले.242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच वेळी, श्रेयस अय्यरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ५६ धावा करून बाद झाला.
त्याआधी, भारताचा सलामीवीर शुभमन गिल ४६ धावांवर अबरार अहमदने बाद केला आणि कर्णधार रोहित शर्मा १५ चेंडूत २० धावांवर शाहीन शाह आफ्रिदीने बाद केला.पण त्यानंतर कोहली आणि अय्यरने शानदार फलंदाजी केली.