Published On : Mon, Apr 24th, 2023
By Nagpur Today Nagpur News

शरद पवारांचे विरोधकांच्या एकजुटीवर मोठे विधान ; 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही सांगता येणार नाही !

Advertisement

अमरावती : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. आज आपण महाविकास आघाडीसोबत आहोत, पण 2024 मध्ये होणारी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही सांगता येणार नाही, असे पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. ते अमरावती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असताना शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु आहे.

Gold Rate
Wednesday March 2025
Gold 24 KT 87,800 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 99,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज आपण महाविकास आघाडीचा भाग आहोत, एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण राजकारणात नेहमीच इच्छाशक्ती पुरेशी नसते. जागा वाटप, काही अडचण आहे की नाही, या सर्वांवर अद्याप चर्चा झालेली नाही. तर मी तुम्हाला याबद्दल कसे सांगू, असे पवार म्हणाले.

फोडाफोडीच्या राजकारणामुळे मोठे नुकसान :
महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. ज्याला असे राजकारण करायचे आहे ते त्यांनी करावे मात्र आम्ही असे राजकारण करणार नाही, असे पवार म्हणाले.

जेपीसी तपास परिणामकारक नाही :
अदानी प्रकरणावर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या जेपीसी तपासाच्या मागणीला शरद पवार यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. ते म्हणाले, “जेपीसीमध्ये २१ सदस्य असतील. त्यापैकी 15 सत्ताधारी, तर 6 विरोधी खासदार असतील. अशा स्थितीत जेपीसी समिती काय निर्णय घेणार हे बोलण्याची गरज नाही. या प्रकरणात जेपीसी नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक प्रभावी ठरेल, असे मी म्हटले होते. मी यापूर्वीही असेच सांगितले होते. असे असतानाही जर विरोधी पक्षांनी जेपीसीची मागणी केली तर मी त्यांच्यासोबत असेन, असे पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

पवारांच्या वक्तव्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या विधानात खूप गांभीर्य आहे, ज्याला विचार करायचा असेल त्याने विचार करावा.. मी एवढेच सांगेन. महाराष्ट्रात राजकीय भांडण सुरूच आहे. संजय राऊत शिंदे-फडणवीस सरकार पडल्याचा दावा करत असतानाच अजित पवार भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 30-34 आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर अजित यांना राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या प्रमुख चेहऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात आहे.

मात्र, त्यांच्या मिशनमध्ये शरद पवार पुन्हा एकदा अडसर ठरत आहेत. जर कोणी (अजित पवार राष्ट्रवादीपासून) वेगळे होण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती त्यांची रणनीती आहे आणि त्यांनी तसे केलेच पाहिजे.आम्हाला भूमिका घ्यावी लागली तर आम्ही कठोर भूमिका घेऊ. यावर काहीही बोलणे योग्य नाही कारण आमची याबाबत काहीही चर्चा झाली नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

महाराष्ट्र विधानसभेची सद्यस्थिती :
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ सदस्य आहेत. राजकीय समीकरणे आणि पक्षाची स्थिती पाहिली तर एनडीए आघाडीसोबत असलेल्या पक्षांच्या आमदारांची संख्या १६२ आहे. दुसरीकडे, विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) बद्दल बोलायचे तर त्यांच्याकडे एकूण 121 आमदार आहेत.

Advertisement
Advertisement