Published On : Sat, Oct 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील रामदासपेठ पुलाचे बांधकाम रखडल्याने नागरिक संतापले ; दिरंगाईला जबाबदार कोण ठेकेदार की मनपा?

नागपूर : शहरातील रामदासपेठ या गजबजलेल्या परिसरातील रहिवासी महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाला होत असलेला प्रदीर्घ विलंब आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यामुळे संतापले आहेत. तसेच याठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना नुकत्याच आलेल्या विनाशकारी पुरानंतर “पंचनामा” म्हणून ओळखल्या जाणार्‍या मूल्यांकनासाठी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी या क्षेत्राला भेट दिली नसल्याची तक्रार केली.

नागपूर टूडे ने याप्रकरणावर प्रकाश टाकत याप्रकरणी रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांसाठी कोणाला जबाबदार धरायचे कंत्राटदार किंवा नागपूर महानगरपालिका (NMC) असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. रामदासपेठमधील पुलाचे बांधकाम सुरुवातीच्या प्रक्षेपित वेळेच्या पलीकडे विस्तारित कालावधीसाठी सुरू आहे. या विलंबामुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

Gold Rate
Friday 28 Feb. 2025
Gold 24 KT 85,400 /-
Gold 22 KT 79,400 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धक्कादायक म्हणजे, अनेक रहिवाशांनी सांगितले की नागपूरच्या पुरानंतर कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा महापालिकेच्या प्रतिनिधींनी पंचनामा करण्यासाठी या भागाला भेट दिली नाही. जेव्हाकी हा भागातही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. रहिवाशांकडून या प्रश्नांवर नाराजी व निराशा व्यक्त केली जात आहे. त्यांना असे वाटते की सरकारी अधिकारी संकटाच्या वेळी वेळेवर मदत आणि आधार देण्याच्या त्यांच्या कर्तव्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

नागरिकांना होणाऱ्या या समस्यांसाठी कोणाला जबाबदार धरायचे कंत्राटदाराला जबाबदार धरायचे की नागपूर महानगरपालिकेला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement