Published On : Thu, Dec 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस पत्रकरांसाठी ठरला डोकेदुखी ;वाहतूक व्यवस्थेमुळे उध्दभल्या अडचणी !

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. मात्र अधिवेशनाचा पहिल्याच दिवस पत्रकरांसाठी डोकेदुखी ठरला आहे. अनियोजित वाहतूक व्यवस्थेमुळे पत्रकारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे.

‘पी3 पार्किंग पास’ असलेल्या काही पत्रकारांना नागपूर वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या वाहतूक नियोजनामुळे त्रास सहन करावा लागला, ज्यामुळे त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला मुकावे लागले. ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी नागपूर टुडेशी बोलताना या समस्येसंदर्भात माहिती दिली. शहरातील हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पत्रकारांसाठी त्रासदायक ठरल्याचे ते म्हणाले. मी विधानभवन ते वाहतूक कार्यालय ते आकाशवाणीपर्यंत सुमारे 40 मिनिटे फिरत राहिलो, परंतु वाहतूक पोलिसांनी नियुक्त केलेल्या ठिकाणी पार्किंगला परवानगी दिली नाही.पासधारकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी समन्वय साधून मोकळा मार्ग उपलब्ध करून देणे हे वाहतूक पोलीस, शहर पोलीस आणि प्रसिद्धी विभागाचे कर्तव्य नाही का?

असा संतप्त सवाल राव यांनी उपस्थित केला. माझ्या 34 वर्षांच्या विधानसभेच्या कव्हरेजमध्ये, मला पहिल्यांदाच या समस्येला तोंड द्यावे लागल्याचेही ते म्हणाले. मी नेहमी कामकाज सुरू होण्यापूर्वीच सभागृहात पोहोचायचो मात्र आज या नियमाचे पालन मला करता आले नाही.

Advertisement

‘नागपूर टुडे’ने यासंदर्भात पोलिस उपायुक्त (डीसीपी) चेतना तिडके यांच्याची संपर्क साधला. मात्र त्यांनी वाहतूक विभागाच्या बाजूने समन्वय नसल्याचा मुद्दा फेटाळला आहे.
पार्किंग पास असलेल्यांचे सुरळीतपणे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तथापि, वैध पार्किंग पासशिवाय, आम्ही कोणालाही सुरक्षेचा भंग करण्यास अधिकृत करू शकत नाही. काही पत्रकार पार्किंग पासशिवाय तेथे होते आणि त्यांना मदत करण्यासाठी, नागपूर वाहतूक विभागाने त्रासमुक्त रहदारीसाठी आवश्यक मदत केली असल्याचे तिडके म्हणाल्या.