Published On : Sat, Sep 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मोदी सरकारला विदेशी पाहुण्यांसाठी गरीब जनता आणि मुक्या प्राण्यांना लपविण्याची गरज नाही ; राहुल गांधींचा हल्लाबोल

Advertisement

नवी दिल्ली : भारताची राजधानी नवी दिल्ली येथे G-20 शिखर परिषद भारत मंडपम येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील सर्व दिग्गजांचे स्वागत केले. त्याचवेळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी जी-20 परिषदेच्या पहिल्या दिवशी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी यांनी ट्विट करून लिहिले की, परदेशी पाहुण्यांपासून भारताचे वास्तव लपवण्याची गरज नाही. तसेच G-20 च्या अनेक पैलूंवर काँग्रेसने सरकारवर हल्ला सुरूच ठेवला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी ट्विट करून हा मुद्दा राजधानीतील गरिबांना लपवण्याचा असल्याचे म्हटले आहे.

Today’s Rate
Fri18 Oct. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 92,800 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पक्षाने यापूर्वी दिल्लीच्या वसंत विहारमधील कुली कॅम्प या झोपडपट्टीचा व्हिडिओ शेअर केला होता, जिथे G-20 शिखर परिषदेपूर्वी सार्वजनिक ठिकाणे लपलेली होती.
काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला.

Advertisement

अनेक रस्त्यावरील कुत्र्यांना क्रूरपणे ओढले गेले आणि पिंजऱ्यात डांबण्यात आले. तसेच, त्यांना अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अशा कृतीविरोधात आवाज उठवून या आवाजहीन प्राण्यांना न्याय देण्याची सरकारकडे मागणी करणे गरजेचे आहे, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.