Published On : Sat, Nov 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

नागपूर : कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार अशी मोठी जाहिरातबाजी भाजपाकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे का?असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात. ही योजना फेल गेली आहे पण उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे.

भाजप सरकारकडून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. जनतेची लूट करून नफा कमावणे हीच या सरकारची खेळी असल्याचे पटोले म्हणाले.

Advertisement